३ देवनं अट मान्य करुन विवाह ठरवला. तसं अटीनुसार त्यानं किरायाचा कमरा घेतला. त्यानंतर त्यानं आपला विवाह केला व अटीनुसार त्यानं विवाहानंतर आपली वरात किरायाच्या कमऱ्यातच वळवली. स्वतःच्या हातचं बनवलेलं घर. त्या घरावर पाणी फेरलं. तसे दोन तीन दिवस झाले. विवाहाला दोन तीन दिवस झाले होते. देव विचारच करीत होता. किराया कसा द्यायचा? पोट कसं पालवायचं? आपलं वेतन तुटपुंजं? आपण विवाह तर केला, परंतु पुढं काय? शेवटी विचार करता करता त्याला मार्ग सापडला. आपण पोलीस स्टेशनला तक्रार करायची. तक्रार करायची की आपलं पासबुक हारवलंय व ती तक्रार आपण