विवाह - भाग 4

  • 252
  • 90

४                        जातीतच विवाह केलेला बरा. देवला तसंच वाटत होतं आजही. कारण देवनं करुणाशी मजबुरीनं विवाह केला होता. जी त्याच्या जातीतील नव्हती. जिला समाजानं आजही स्विकारलं नव्हतं. समाजाला आजही जातच आवडत होती. त्याचं कारण होतं जातीची बंधनं. जातीनं अख्ख्या समाजाला जातीच्याच बंधनात बांधून टाकलं होतं. जात ही जन्मापासूनच बांडगुळासारखी आयुष्याला चिकटून राहात असे. ती बदलत नसे वा कुणाचीही जात तेव्हापर्यंत बदललेली नव्हती. शिवाय मुलांचं शाळेत नाव दाखल करतांना जात टाकावी लागत असे. जात आधारीतच बरेच विवाह होत होते व सध्यातरी आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती. असा आंतरजातीय विवाह कोणी केल्यास त्याला समाज