२ विवाह (कादंबरी) अंकुश शिंगाडे काय चुकलं होतं त्या दोघांचं ते कळत नव्हतं. त्यांच्याच नशिबाला ते भोग का आलेत. तेही कळत नव्हतं. नियतीनं त्यांच्याच जीवनात ते दुःख का आणलं तेही कळत नव्हतं. देवचं काहीच चुकलं नव्हतं. तो तिला काहीही बोलला नव्हता. तरीही त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. कारण काय होतं कळत नव्हतं. देवचं तिच्यावर निरतिशय प्रेम होतं. विवाहानंतर ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते आनंदातच होते. आनंदातच बागेत जाणे, गप्पागोष्टी करणे, भेल, आईस्क्रीम खाणे. इत्यादी गोष्टी ते नित्यनेमानं करीत होते.