हे काम तर एवढं शाश्वत झालेलं होतं की कितीही मोठा पाण्याचा प्रवाह आला असतातरी रस्ता शाबूत राहिला असता.काम निम्मे झालं तेव्हा साहेबांची व्हीजीट झाली . त्यावेळी गटारातलं पाणी खालच्या अंगाने निचरा करायची ही युक्ती त्याना भलतीच आवडली. कोकणातल्या जानपद निरक्षर माणसांचं हे तांत्रिक कसब तज्ज्ञ इंजिनीअरलाही मागे टाकणारं आहे असे प्रशंसोद्गार त्यानी भाऊंसमोर काढले. नवीन बदलेल्या एस्टिमेट प्रमाणे पुढच्या कामाचा टप्पा बदलेला होता. काम सुरू असताना बळी नेहेमीप्रमाणे नजर करायला आली तेंव्हा तो भाऊना म्हणाला कि, “ ह्या फुडचा वाडीव काम तुमका माज्यामुळा मिळालेला हा. तवां तां काम तुमी माका द्येवचा. मागच्या येळी लयथोडो शिलीपाट तुमी