दोन कन्यादानातून मिळालेले दोन पुत्र

  • 450
  • 165

कथा: दोन कन्यादानातून मिळाले दोन पुत्र.गणपतराव आणि रमाबाई काळे यांचं छोटंसं पण प्रेमळ जग होतं. गावाच्या शाळेत दोघंही शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांचं घर म्हणजे ज्ञान, साधेपणा आणि मायेचा संगम. परिस्थिती फारशी सुस्थितीत नव्हती, पण नात्यांतली श्रीमंती त्यांच्याकडे मनसोक्त होती. एक साधा आयुष्य पण आनंदाने जगत होते. आनंदाचा कारण म्हणजेत्यांच्या संसारातील.दोन गोंडस मुली – संध्या आणि नीला.पण गणपतरावांच्या मनात मात्र एक सल लपलेला होता – “मुलगाच नाही आपल्याला… म्हातारपणाचं काय?” पण रमाबाई त्यांना सावरत म्हणायच्या, “आपल्या मुलीच आपला आधार बनतील. आपण त्यांना घडवूया असं की जग आपल्याला म्हणेल – धन्य आहेत ही पोरं आणि त्यांचे आईवडील!”संध्या आणि नीला यांच्या लहानपणी