शामराव दुसऱ्या ट्रीप च्या वेळी पन्नास पोती कांदा घेवून आला. दर खूप कमी होता भरताड करणाऱ्या फैलातल्या गड्यानी हातोहात सगळी पोती संपवली. त्यानंतर दर तीन चार दिवसाआड दोन दोन लोड भरायचं काम शिस्तीत सुरू होतं. पुढचा सीझन भर कामाचा असाच धुमेपलास सुरू रहायचा होता. म्हणून कामगाराना अधून मधून देता यावं याबेताने पाच सहा काथोटल्या लोणचं घालून ठेवायची वर्दी भाऊनी दिली. येसू मिराशाचा लोणच्याचा आंबा घडानी ओथंबलेला होता. त्याचे तीन फाटी आंबे आणून पैरी करून भाऊंच्या मागारणीने लोणच्याची बेगमी करून ठेवली. तसेच दोन मोठ्या मातीच्या घड्यांमध्ये खारातले आंबे घातले. दहा लोड घातल्यावर पुढच्या ट्रीपला बाबूरावाने