आनी दुसरा म्हनशा तर आवंदा जग दुनियेत लय बागांची कामा सुरू हायेत..... इतक्या सगल्यान्ला थोडाच गिराईक भेटनार हाय.....तिकडे गडा पासून (विजयदुर्ग) देवगड कुनकेसूर पावत बागांची लय कामा चल्लेली आशेत.... तकडे दो दोन वर्सा खुटवळ पडून आशे. तेनला गिराईक बी भेटतनाय..... तुमचे कमीच तरी वीसावर पाच लोड आशेत येवडा म्हाल उकलन्याची शामत इकडच्या भागात तरी कोन येपारी माला दिसत नाय......तुमी इचार करा जुम्मादिन झाल्यावर मी खेप करीन तवा काय तां नक्की सांगा....” अशी भीती दाखवून इद्रूस उठून गेला. ठोक व्यापाऱ्यांची व्यवहार करायची नीती आणि बोलण्याची ठराविक पद्धत होती. एकतर धंद्यात मुरलेले व्यापारी सर्व सामान्याला बेअक्कल समजून त्याच्या मालाची जमेल तेवढी केंड करून त्याला बुचकळ्यात पाडीत. माल कमी असेल तर