आज अनघाला लवकरच जाग आली आर्वी आणि मनीषा ताई अजुनही झोपलेल्या. तिने फ्रेश होऊन सर्व आवरल आणि बाहेर आली... आता जवजवळ दीड महिना झालेला लग्नाला तरी काही फारसे जवळ आले नव्हते दोघं. कधीतरी बोलायचे कधी तरी तर 7 8 दिवस बोलणंच नसायचं.... आर्वी सोबत रुळली होती अनघा पण अनय अजून तरी तिने फारस ओळखल नव्हत... पण जेवढ दिसत होता त्यावरून तिला अनय च टेन्शन, धावपळ सर्व दिसत होता... म्हणुच रात्री ती स्वतःहून बोलायला गेली... ती रूम मधून किचन मध्ये जातच होती तर तिने पाहिलं अनय अजून झोपलेला आहे... म्हणून ती किचन मध्ये गेली