हर्षदला आज ऑफीसला जाण्यासाठी उशीर झाला होता. लवकर न उठवल्यामुळे तो बायकोवर चिडचीड करत होता. त्याने घाई - गडबडीमध्ये आवरलं. आणि तो बाईकवर ऑफीसकडे जायला निघाला. ऑफीसकडे जाणारा शहरातील मुख्य रस्ता असल्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांची खूप वर्दळ होती. त्यामुळे हर्षद खूप वैतागला होता. एका सिग्नलवर त्याच्या बाईकच्या पुढे दुसरा बाईकस्वार येवून थांबला. तो पुढे येवून थांबल्यामुळे हर्षदला त्याचा खूप राग आला. हर्षद स्वत:च्या मनाशीच पुटपुटला. ‘ किती मुर्ख लोक आहेत. एवढी घाई करायला यांना कोठे जायचे असते काय माहित ? ’ त्या बाईकस्वाराने हर्षदचे ते शब्द ऐकले. हर्षदचे ते शब्द आपल्यालाच