विवाह टिकवावाच? हे जीवन आहे व जीवन जगत असतांना लोकं विवाह करतात. विवाह हा केवळ आपले लाड पुरविण्यासाठी नसतोच. विवाह असतो, आनंदी जीवन जगण्यासाठी. ज्यात सुख दुःख येत असतात. तसं पाहिल्यास सुख दुःख हे पाचवीलाच पुजलेले असतात माणसाच्या. दुःख हे माणसाच्या जीवनात पावलोपावली येय असतात. त्याला घाबरुन जावं नये म्हणूनच विवाह असतो व आपण तो करतो. त्याचं महत्वपूर्ण कारण असतं, ते म्हणजे आपले आईवडील. आपले आईवडील आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत जीवंत राहात नाहीत. म्हणूनच आपले आईवडील आपला विवाह करुन देत असतात. आपलं सदोदीत सुख पाहणाऱ्या आपल्या आईवडीलांना नित्य वाटत असते की आम्ही जरी मरण पावलो तरी आमची