घरी गेल्यावर भाऊनी पिशवी कपाटात ठेवून कुलुप घातलं. त्या पंच क्रोशीतली काही मंडळी पैसेवाली होती हे भाऊ ऐकून होते. दादा खोतानी बसल्या बैठकीत इतकी मोठी रक्कम आपल्या शब्दा सरशी कसलाही बियादा न सांगता कशी काय दिली हे भाऊना कोडंच वाटलं. जेवणं झाल्यावर भांडी घासायला आलेल्या काशी बाणणीला बाबल्याला भेटायला ये असा निरोप सांगायला पाठवली. बाबल्या आला. त्याला सोबत घेवून गोठ्यात जाताना ते म्हणाले, “ घरात जोकमीची वस्तू हा..... आता मी सांगासर तू चोवीस तास जेवणा खाण्यासकट माझ्या घरीच ऱ्हवायचा...... ” संध्याकाळी ते बर्वे मास्तराना भेटायला गेले, त्याना सादिलात काय विषय आहे तो सांगितल्यावर त्यानी रत्नागिरीला जायचा