सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 5

  • 861
  • 1
  • 216

काम सुरू होते तिथे  आजू बाजुला धवडाचं काटं , मोंड्यांची  खरी  आणि बाणे , येरम यांच्या खरी होत्या.  (खरी म्हणजे खोलगट कातळी भागात ४/५आंगूळे ते वीतभर उंच मातीची भर घालून केलेले  शेत मळे) कवळाच्या भाऱ्यांची निर्गत लावायची जबाबदारी  भाऊनी  धाकू नी बाबल्या यांच्यावर सोपवली. चार दिवसानी रत्नागिरी  गाठून त्यानी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याचे वर्दी दिली. साहेब त्यावेळी रजेवर  होते.  पण अव्वल कारकूनाने  प्रोसिजर प्रमाणे विहीत नमुन्यात कम्प्लायन्स रिपोर्ट तयार करून त्यावर भाऊंच्या सह्या घेवून तो  दाखल करून घेतला. प्रोसिजर प्रमाणे केलेल्या कामाची पाहाणे करून ते कंत्राटात  दिलेल्या अटीशर्थी प्रमाणे झाले आहे की नाही  याची  पडताळणी  करून  त्याचा फेव्हरेबल  व्हेरिफिकेशन