नमस्कार मित्रांनो,आजची ही कथा एखाद्या स्पूकी , क्रिपी किंवा भयावह जगाचे दार उघडल्या जाणाऱ्या एखाद्या नंबरवर आधारित आहे. तर करू सुरुवात कथेला.उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या, दिड महिना अगदीच रिकामा वेळ असणारे शाळकरी मूले आपल्या गावी जाण्यासाठी उत्साही होते. मे आणि जूनच्या महिन्यातील मित्र मंडळी त्यांना भेटणार जे होते, मित्रांनो काही ही म्हणा वर्षांतून एकदा भेटणाऱ्या मित्रमंडळीवर आपला जास्तच जीव असतो, तसाच जीव नैत्राचा आणि पावनीचा त्यांच्या गावी असणाऱ्या मैत्रीणी निता आणि दिपावर होता.