ऑपरेशन सिंदूर - भाग 10 (अंतिम भाग)

  • 2.3k
  • 966

१०                      भारत सन १९४७ ला स्वतंत्र्य झाला. हे सर्वांनाच माहित आहे. त्यावेळेस इंग्रजांनी या देशाला कंगाल बनवलं होतं. आर्थिक समृद्धी नव्हतीच देशात. अशावेळेस भारतानं कशाचीही कुरकूर न करता केवळ संयम राखून आपले पाय पसरण्यास सुरुवात केली. ज्यातून काही इमानदार नेत्यांनी स्वतःची पोळी न भाजता भारताचा विकास केला. ते स्वतः बसने प्रवास करीत. कोणत्याही प्रकारचं खाजगी वाहन न वापरता. आजचे नेते असे नाहीत की जे बसने प्रवास करतील. आजचे लहानमोठे नेतेही विमानानंच प्रवास करतात. एवढा देशातील जनतेला लुटून देशातील नेते पैसे कमवितात. परंतु त्यातही काही इमानदार नेते आहेत की त्यांच्या भरवशावर भारत