नशीबवान असतात ते? *म्हातारपण, बालपण व तरुणपण..... खरंच रमणीय असावं. असं सर्वांनाच वाटत असतं. तसं पाहिल्यास तरुणपण व म्हातारपण हे प्रत्येकालाच येत असतं असं नाही. काहीजण काळाच्या ओघात लवकरच आपली पृथ्वीवरील जीवनयात्रा संपवून निघून जातात. त्यामुळं ज्यांच्या वाट्याला हे तरुणपण व म्हातारपण येत असतं, ते खरंच नशीबवान असतात. कारण तरुणपणातच व म्हातारपणातच खरं बालपण अनुभवायला मिळत असतं.* बालपण....... काय असतं बालपण की ज्या बालपणात रमणीयता असते. आनंद असतो त्या बालपणात. तरीही कंटाळा येतोय. त्याचा. वाटत असतं की आपण मोठे व्हायलाच हवे. कारण मोठे झाल्यावर कोणाची कटकट तर नाही ना राहणार.