जातविवाह व्हायलाच हवेत?

  • 624
  • 201

*जातीतच विवाह केलेला बरा?*          *सध्या आंतरजातीय विवाह लोकं राजरोषपणे करु लागले आहेत. त्याचं कारण आहे जातविवाहात येणारा अती खर्च, हुंडापद्धती व पाश्चात्यीकरण. ज्यातून जातविवाहातील प्रथा, परंपरा व त्यातून निर्माण होणारे संस्कार याला तिलांजली देण्याचे प्रयत्न होत आहेत. जातविवाह न होणे म्हणजेच समाजात कुसंस्काराचे वृद्धीकरण होणे होय. असे सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. ते आपल्या भावनेने असल्या प्रकारांना रोखू पाहात आहेत. परंतु ते शक्य नाही. प्रेमविवाह लोकांना मान्य नाही. त्याचं कारण आहे ते मूल आणि त्याचा परीवार. ते मूल कसं आहे. त्याचा परीवार कसा आहे. हे माहित नसतं. शिवाय तो परीवार कसा निघेल वा ते मूल कसं निघेल.