सगळं ऐकल्यावर साधिकाच्या डोक्यात वेगात विचारचक्र फिरायला लागतात. अर्जुनला कसं सोडवायचं याचा विचार करता करता तिचा डोळा लागतो. रेणुका आणि साधिका झोपल्याची खात्री होताच आजोबा आणि दिगंबर एका खोलीत जातात आणि त्या खोलीत असलेल्या दत्तांच्या तसबिरीपुढे डोळे मिटून बसतात. —----------------------------------------------------- सकाळी उठल्यावर काहीतरी विपरीत घडेल या जाणिवेने अभिमन्यूला अस्वस्थ वाटू लागते. तो आज येणार नसल्याचे त्याच्या महाविद्यालयात कळवतो आणि एकदा श्रेयाला फोन करतो. मात्र तिने फोन न उचलल्याने तो साधिकाला भेटायचे ठरवतो आणि आवरायला घेतो. आरती : काय हो, अभि अजून कसा खाली आला नाही…अजून झोपूनच आहे की काय? अजित : तू नाश्ता वाढायला घे…मी त्याला बघून येतो… तेवढ्यात अभिमन्यू